ठाण्यात लोखंडेंच्या अपहरणाच्या निषेधार्थ महामोर्चा

नगरसेविकेच्या अपहरणाच्या विरोधात महायुतीनं पुकारलेल्या ठाणे बंदला काल हिंसक वळण लागलं होतं. आज अपहरणाच्या विरोधात महायुतीनं पुन्हा महामोर्चाचं आयोजन केलंय. कालच्या ठाणे बंदमुळं आधीच ठाणेकर वैतागले होते.

Updated: Mar 5, 2012, 12:42 PM IST

 www.24taas.com, ठाणे 

 

ठाण्यात महापौरपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळं नगरसेवकांची पळवापळवी, फोडाफोडी तेजीत आहे. अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या नगरसेवकांना आपल्या बाजुला वळवण्यासाठी राजकीय पक्ष साम दाम दंड नितीचा उपयोग करताना दिसतायेत. त्यातच भाजपच्या बेपत्ता नगरसेविका सुहासिनी लोखंडे यांचा अजूनही पत्ता लागलेला नाही.

 

सुहासिनी लोखंडे यांचं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अपहरण केल्याचा आरोप युतीच्या नेत्यांनी केलाय. त्यावरुन आव्हाड यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय. नगरसेविकेच्या अपहरणाच्या विरोधात महायुतीनं पुकारलेल्या ठाणे बंदला काल हिंसक वळण लागलं होतं.

 

आज अपहरणाच्या विरोधात महायुतीनं पुन्हा महामोर्चाचं आयोजन केलंय. कालच्या ठाणे बंदमुळं आधीच ठाणेकर वैतागले होते. त्यातच आजच्या महामोर्चामुळं काही गडबड तर होणार नाही ना अशी भीती ठाणेकरांमध्ये आहे.

 

[jwplayer mediaid="60011"]