गुडबाय २०१२- पीकपाणी

सिंचन घोटाळ्यात श्वेत पत्रिका, काळी पत्रिका आणि सत्य पत्रिका सादर करण्यात आली. मात्र सगळ्याच सत्ताधा-यांनी जबाबदारी झटकत राजकारणात रंग भरले. मात्र सत्ताधा-यांच्या फक्त बैठका आणि चर्चासत्रांचे पीक आलंय. यावर्षी अशा प्रश्न निकालात काढून कृती करण्या ऐवजी वेळ मारुन नेण्याचेच प्रकार या वर्षी दिसून आलेत

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 24, 2012, 11:12 PM IST

www.24taas.com, मुंबई
सिंचन घोटाळ्यात श्वेत पत्रिका, काळी पत्रिका आणि सत्य पत्रिका सादर करण्यात आली. मात्र सगळ्याच सत्ताधा-यांनी जबाबदारी झटकत राजकारणात रंग भरले. मात्र सत्ताधा-यांच्या फक्त बैठका आणि चर्चासत्रांचे पीक आलंय. यावर्षी अशा प्रश्न निकालात काढून कृती करण्या ऐवजी वेळ मारुन नेण्याचेच प्रकार या वर्षी दिसून आलेत..
सिंचन घोटाळ्यामुळे शेतक-यांचं मोठं नुकसान झालं
राज्यात गेल्या ५०-६० वर्षात ५३ मोठे २१२ मध्यम आणि २४५७ सिंचन प्रकल्प बांधून पूर्ण झालेले आहेत. त्यातून ४० लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात मात्र १७ लाख हेक्टर क्षेत्रावर सिंचन होते. म्हणजेचं पूर्ण झालेल्या सिंचन प्रकल्पातून निर्माण झालेले पाणी २३ लाख हेक्टर क्षेत्रापर्यंत पोहचलंच नाही. त्यामुळे २३ लाख हेक्टर क्षेत्रातील लाभार्थी शेतकरी आजपर्यंत सिंचन सुविधांपासुन वंचित आहे. त्यामुळेच आज पाणी पळवा पळवीचे सत्र सुरु झालं असून राजकारण तापलंय.दरम्यान
राजीनामा आणि मंत्रीपदाच्या शपथ घेण्याचंही नाट्य रंगवलं मात्र आपण राज्याचा कारभार करतो आणि त्याची जबाबदारी आपली आहे ही साधी भावना कधीच कोणीही व्यक्त करतांनी दिसलं नाही हे राज्याचं दुर्दैव आहे. शेतकरी खरंच असल्या नाट्यांसाठीचं मतदान करतो का हे आणि हे सरकार खरंच दुष्काळात शेतक-यांना काय मदत करतील हिच चिंता या वर्षी शेतक-यांनी व्यक्त केलीय.शेतक-यांचे संसार उध्वस्त करुन उभारलेल्या धरणातील पाण्याचा प्राधन्य क्रम उद्योगांना देण्याचे धोरण शेतकरी कधीही खपवून घेणार नसल्याने येत्या काळात पाण्यासाठी आंदोलन तीव्र होणार असल्याचं मत वेळोवेळी शेतक-यांनी व्यक्त केलंय.
फळबागा
फळबागांवरही यंदा संकटांचे काळे ढग गडगडले. द्राक्षाला मात्र वर्ष चांगलं गेलं.. पावसाच्या तडाख्यात केळी, संत्र्यांच्या बागा उध्वस्त झाल्या तर पावसाअभावी डाळिंबाचं नुकसान झालं.डाळिंबाचं उत्पादनवाढीसाठी शेतक-यांनी यावर्षी जास्ती जास्त तज्ञांचं मार्गदर्शन घेउन उत्पन्नात वाढ करण्याच प्रयत्न केला.
पावसाअभावी यंदा संत्र्यांच्या अनेक बागा उध्वस्त झाल्या. कमी पाण्यामुळे या पिकाच्या लागवड क्षेत्रात घट दिसून आली. तसेच किडीच्या प्रादुर्भाव आणि डिंक्यारोगा मुळे हि शेतक-यांचं मोठं नुकसान झालं. तसेच अचानक झालेल्या अतिपावसामुळे बागांवर प्रतीकुल परिणाम झाला. संत्रा उत्पादक ते थेट ग्राहक फायदेशीर योजना पणन मंडळ आखणार असून याचा फायदा शेतक-यांना होणार असल्याचबी समाधानकारक बाब मात्र यावेळी पुढे आली.
केळी-गेल्या काही वर्षापासून सिगाटोका, बंचीटॉप,क्लोरोसीस, या रोगामुळे केळी पिकाच्या लागवड क्षेत्रात 20 ते 30 टक्क्यांनी घट दिसून आली. केळीला सुरुवातीला 1700 रुपये एवढा दर मिळाला होता मात्र शेतक-याच्या बांध्यावर उत्पन्न येताच इतर शेतमालाप्रमाणे केळीचेही दर पडले. बाजारपेठेचा प्रश्न सोडवण्यासाठी भुसावळहुन विशेष हॉर्टिकल्चर ट्रेन सुरु करण्यात आली मात्र या ट्रेनमध्ये कुठलही सातत्य दिसून येत नाही.ज्या शेतक-यांकडे पाण्याचा स्त्रोत चांगला होता त्यांना हे वर्ष चांगलं गेलं मात्र सध्याच्या दुष्काळी परिस्थीती पाहता नविन बागांवर मोठं संकट आहे.
द्राक्ष-यंदा पाण्याअभावी द्राक्षाच्या 3 लाख एकर जमिनीवर सावट आहे. काही ठिकाणी अजूनही पाण्याअभावी बागांची छाटणी सेतक-यांनी केली नाही. काही शेतक-यांनी आत्तपासूनच टँकरने पाणी द्यायला सुरुवात केली आहे एकुण साडेचार हजार कोटींहुन अधिरक गुंतवणूकीवर यामुळे परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतक-यांना कॅनलच्या माध्यमातून मिळणारं पाणी नियमीत मिळावं आणि त्यात कुठलंही राजकारणन आणता शेतक-यांचं नुकसान टळेल अशी मागणी शेतक-यांनी केलीय. तसेचअसून, पाऊस नसल्यामुळे डाउनी रोगाचा प्रादुर्भाव नसला तरी भूरीचा प्रादुर्भाव द्राक्ष बागेवर झालाय. यंदाचं वर्ष द्राक्ष उत्पादकांना चांगलं गेलं असून सध्या शेतक-यांनी छाटणीला सुरुवात केली आहे.तसेच नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना फळपीक योजनेअंतर्गत गारपीट विमा संरक्षण देण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिलीय. लाखांच्यावर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

विशेष म्हणजे दुष्काळाचं सावट असतांनाही शेतक-यांनी यंदा मोठ्या प्रमाणात डाळिंबाच्या लागवडीवर भर दिला. पाण्याचं थेंब आणि थेंबाचं नियोजन करुन शेतक-यांनी डाळिंबाचं व्यवस्थापन केलं. डाळिंबापासून मिळणार उत्पादनाने शेतक-यांना दिलास दिला असला तरी पाण्यअभावी शेतक-यांच्या उत्पादनात घट दिसून आली.