एअर इंडियाचं मुख्यालय पुन्हा मुंबईला हलवा - शिवसेना

एअर इंडियाचे मुख्यालय पुन्हा मुंबईला हलवा, अशी मागणी शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळानं आज केली. शिवसेना खासदारांनी एअर इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक रोहित नंदन यांची भेट घेऊन, ही मागणी केली. 

Updated: Jul 24, 2015, 02:13 PM IST
एअर इंडियाचं मुख्यालय पुन्हा मुंबईला हलवा - शिवसेना title=

नवी दिल्ली : एअर इंडियाचे मुख्यालय पुन्हा मुंबईला हलवा, अशी मागणी शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळानं आज केली. शिवसेना खासदारांनी एअर इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक रोहित नंदन यांची भेट घेऊन, ही मागणी केली. 

2007 मध्ये एअर इंडिया लिमिटेड आणि इंडियन एअरलाइन्स या दोन कंपन्यांचं विलिनीकरण झालं. त्यानंतर एअर इंडियाचं मुख्यालय मुंबईहून दिल्लीला हलवण्यात आलं. 

मात्र ज्या इमारतीत मुख्यालय हलवण्यात आले, त्या इमारतीची अवस्था फारच वाईट आहे. कर्मचा-यांना आणि फायलींनाही धड जागा नाही. त्यामुळं मुख्यालय पुन्हा मुंबईला हलवावं, अशी मागणी यावेळी शिवसेना खासदारांनी केली.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.