लोकसंख्या पाहून गुगलचा 'वायफाय' घाबरला

रेल्वे स्थानकावर मोफत वायफाय लावणार असल्याचं भारतीय रेल्वेने जाहीर केलं होतं. त्यासाठी भारतीय रेल्वेने गुगल सोबत करार केला होता. गुगलची टीम रेल्वे स्थानकावर सर्वे करण्यासाठी आली होती. पण रेल्वे स्थानकावरील रोज येणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहुण गुगलची टीम घाबरली.

Updated: Dec 30, 2015, 06:30 PM IST
लोकसंख्या पाहून गुगलचा 'वायफाय' घाबरला title=

नवी दिल्ली : रेल्वे स्थानकावर मोफत वायफाय लावणार असल्याचं भारतीय रेल्वेने जाहीर केलं होतं. त्यासाठी भारतीय रेल्वेने गुगल सोबत करार केला होता. गुगलची टीम रेल्वे स्थानकावर सर्वे करण्यासाठी आली होती. पण रेल्वे स्थानकावरील रोज येणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहुण गुगलची टीम घाबरली.

बरेली, मुरदाबाद, लखनऊ, दिल्ली, यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांवर वायफाय लावण्यात येणार होते. गुगलने जर्मनी, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशातील रेल्वे स्थानकांसाठी तयार करण्यात आलेल्या वायफाय भारतात लावण्याचा निर्णय घेतला होता. त्या देशांमध्ये प्रवाशांची संख्या २००० पर्यंत असते.

भारतातील रेल्वे स्थानकावर केलेल्या सर्वेनुसार भारतात २४ तासातच प्रवाशांची संख्या हजारोंच्या वर जाते. त्यामुळे हे वायफाय येथे चालणे अवघड आहे. त्यासाठी गुगल आता लोकसंख्येनुसार वेगळे वायफाय तयार करणार आहे. त्यामुळे नव्या वर्षात तरी रेल्वे स्थानकांवर वायफाय सेवा मिळणार नाही हे निश्चित झालंय.