'बालिकावधू' कोर्टात झाली दाखल!

अजमेरमध्ये एका १९ वर्षीय मुलीनं आपला विवाह अवैध करार करण्यात यावा, अशी याचिका कोर्टात दाखल केलीय. 

Updated: Dec 24, 2015, 02:00 PM IST
'बालिकावधू' कोर्टात झाली दाखल! title=
प्रातिनिधिक फोटो

नवी दिल्ली : अजमेरमध्ये एका १९ वर्षीय मुलीनं आपला विवाह अवैध करार करण्यात यावा, अशी याचिका कोर्टात दाखल केलीय. 

अजमेरमध्ये राहणाऱ्या कवितानं ही मागणी केलीय. ती सध्या इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतेय. मिळालेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी कविताला ती स्वत: विवाहीत असल्याचं समजलं तेव्हा जबर मानसिक आघात बसला. कविताचा ती अडीच वर्षांची असतानाच विवाह झाला होता. यानंतर, तिनं कोर्टात धाव घेतली.

बीटेकचं शिक्षण घेणाऱ्या कविताचा विवाह ज्या व्यक्तीशी झाला ती व्यक्ती फारशी शिकलेली नाही. कविताला इंजिनिअर बनायचंय. मात्र, कुटुंबीय आणि सामुदायिक पंचायतीचा तिच्यावर फार दबाव आहे. 

 जोधपूरच्या सारथी ट्रस्टच्या मदतीनं कविताना राजस्थानच्या कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केलीय. यामध्ये आपला विवाह रद्द करण्यात यावा, अशी विनंती तिनं न्यायालयाकडे केलीय.