तामिळनाडूत जलीकट्टू खेळाला गालबोट, तिघांचा मृत्यू

जलीकट्टू खेळावरील बंदी उठल्यानंतर तामिळनाडूत रविवारी विविध ठिकाणी या खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या खेळाला गालबोट लागलंय. 

Updated: Jan 23, 2017, 07:59 AM IST
तामिळनाडूत जलीकट्टू खेळाला गालबोट, तिघांचा मृत्यू title=

चेन्नई : जलीकट्टू खेळावरील बंदी उठल्यानंतर तामिळनाडूत रविवारी विविध ठिकाणी या खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या खेळाला गालबोट लागलंय. 

जलीकट्टू खेळा दरम्यान तिघांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. शिवाय 28 जण जखमी झालेत. बैलाने शिंगे खुपसल्याने किंवा त्यांच्या पायाखाली येऊन चिरडल्याने हे सर्व जखमी झालेत. 

जयहिंदपुरम इथले 48 वर्षीय चंद्रमोहन यांना शरीरातील पाणी कमी झाल्याने जीव गमवावा लागलाय. मदुराईत जलीकट्टूच्या आंदोलनात ते सहभागी झाले होते