व्यापम घोटाळ्यातल्या आरोपींचं राष्ट्रपतींकडे दया मरणासाठी पत्र

दयामरणाची परवानगी द्या अशी लेखी मागणी करणारं पत्र, व्यापम घोटाळ्यातल्या आरोपींनी राष्ट्रपतींना लिहिलं आहे. 

Updated: Aug 9, 2015, 09:42 AM IST
व्यापम घोटाळ्यातल्या आरोपींचं राष्ट्रपतींकडे दया मरणासाठी पत्र title=

नवी दिल्ली: दयामरणाची परवानगी द्या अशी लेखी मागणी करणारं पत्र, व्यापम घोटाळ्यातल्या आरोपींनी राष्ट्रपतींना लिहिलं आहे. 

मध्यप्रदेशातल्या गाजलेल्या व्यापम घोटाळ्यातले 140 आरोपी ग्वाल्हेर तुरुंगात कैद आहेत. त्यापैकी 70 कैद्यांनी हे पत्र लिहिलं आहे. गेल्या एका वर्षापासून, आपण तुरुंगात आहोत. मात्र आपल्याला अजूनही जामीन मिळालेला नाही. त्यामुळे दयामरण तरी द्या अशी विनंती, त्यांनी पत्राद्वारे राष्ट्रपतींना केली आहे. सोबतच पंतप्रधान, गृहमंत्री आणि इतरांनाही त्यांनी ही पत्र पाठवली आहेत. 

दरम्यान ग्वाल्हेर कारागृहाचे अधिक्षकांनी मात्र अशा प्रकारचं कोणतंही पत्र कारागृहातून पाठवलं गेलं नसल्याचं म्हंटलं आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.