राणादाने सोशल मीडियावरुन मागितली माफी

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला राणादा अर्थात हार्दिक जोशीने सोशल मीडियावरुन आपल्या चाहत्यांशी संवाद साधलाय. यावेळी त्याने चाहत्यांची माफीही मागितलीये.

Updated: Mar 16, 2017, 04:42 PM IST
राणादाने सोशल मीडियावरुन मागितली माफी title=

मुंबई : 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला राणादा अर्थात हार्दिक जोशीने सोशल मीडियावरुन आपल्या चाहत्यांशी संवाद साधलाय. यावेळी त्याने चाहत्यांची माफीही मागितलीये.

तुझ्यात जीव रंगला ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. राणादा आणि अंजली यांची प्रेमकथेने साऱ्या प्रेक्षकांनाचा भुरळ घातलीये. टीआरपीमध्ये सध्या ही मालिका अव्वल आहे. 

चाहत्यांनीही या जोडीला अक्षरश: डोक्यावर घेतलेय. मालिका सुरु झाल्यानंतर अल्पावधीत प्रेक्षक या मालिकेला मोठा प्रतिसाद देतायत. प्रेक्षकांच्या मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल हार्दिक जोशीने सोशल मीडियावरुन प्रेक्षकांचे आभार मानलेत. त्यासोबतच कामाच्या व्यापामुळे चाहत्यांना वेळ देता येत नाही याबाबत त्याने माफीही मागितली.