प्रत्युषाच्या आत्महत्येनंतर राखीनं मोदींकडे केली ही मागणी...

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्येनंतर 'ड्रामा क्वीन' राखी सावंतनं मोदी सरकारकडे एक अजब मागणी केलीय. 

Updated: Apr 5, 2016, 05:54 PM IST
प्रत्युषाच्या आत्महत्येनंतर राखीनं मोदींकडे केली ही मागणी...  title=

मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्येनंतर 'ड्रामा क्वीन' राखी सावंतनं मोदी सरकारकडे एक अजब मागणी केलीय. 

प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्या प्रकरणात तिचा बॉयफ्रेंड आणि लिव्ह इन पार्टनर राहुल राज याच्यावर पोलिसांनी आत्महत्येसाठी दबाव टाकल्याचा गुन्हा नोंदवलाय. 

याच प्रकरणात मंगळवारी 'बिग बॉस'ची एक सहभागी असलेली राखी सावंत हिनंदेखील एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राखी हातात एक सिलिंग फॅन घेऊनच दाखल झाली होती. 

मोदी सरकारकडे मागणी

'आपल्या देशातील महिला पंख्याला गळफास लावून आत्महत्या करत आहेत... , आपल्या मुली, बायका, सुनांचा जीव वाचवण्यासाठी मोदी सरकारनं सिलिंग फॅनच बॅन केले पाहिजेत' अशी अजब मागणी राखीनं या पत्रकार परिषदेत केली. 

आपल्याकडे प्रत्युषाचे अनेक व्हिडिओदेखील आहेत, यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होऊ शकतील, असा दावाही राखी सावंतनं केलाय. 

राहुलला एक कोटी मिळणार?

शिवाय, प्रत्युषानं आपल्या नावावर एक करोडोंची लाईफ इन्शुरन्स पॉलिसीही घेतली होती. यामध्ये तिनं राहुलला आपला नॉमिनी बनवलं होतं, असंदेखील राखीनं म्हटलंय.