जेव्हा मुख्यमंत्र्यांनी रिकू राजगुरुला विचारलं की...

'पिस्तुल्या', 'फँड्री' आणि आता 'सैराट' या मराठी सिनेमाचे दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील वर्षा बंगल्यावर 'सैराट'च्या टीमचं खास कौतूक केलं.

Updated: May 11, 2016, 08:41 AM IST
जेव्हा मुख्यमंत्र्यांनी रिकू राजगुरुला विचारलं की... title=

मुंबई : 'पिस्तुल्या', 'फँड्री' आणि आता 'सैराट' या मराठी सिनेमाचे दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील वर्षा बंगल्यावर 'सैराट'च्या टीमचं खास कौतूक केलं.

सैराटची टीमचे प्रमुख कलाकार आर्ची अर्थार रिंकू राजगुरु (प्रेरणा), परशा अर्थता आकाश ठोसर आणि खुद्द दिग्दर्शनक नागराज मंजुळे आणि त्यांची सर्व टीम यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्याशी खुल्या मनाने गप्पा मारल्यात.

सलगपणे ३ राष्ट्रीय पुरस्कारांची हॅट्रिक साधणारा कदाचित एकमेव भारतीय चित्रपट दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे असतील. नागराज यांनी अस्सल ग्रामीण भागात सिनेमाचे शूटिंग केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जेव्हा रिंकू राजगुरु भेटली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी रिंकूला वितारलं की, 'आज काय बुलेटवर आली नाहीस का?