पवारांची खेळी राष्ट्रवादीला तारणार का?

ज्यांच्या डाव्या हाताला कळत नाही की उजवा हात काय करते आणि सहज गेम होतो, असं राजकीय वि आहे आणि ज्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होतो, ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार.

Updated: Oct 2, 2014, 02:05 PM IST
पवारांची खेळी राष्ट्रवादीला तारणार का? title=

मुंबई : ज्यांच्या डाव्या हाताला कळत नाही की उजवा हात काय करते आणि सहज गेम होतो, असं राजकीय वि आहे आणि ज्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होतो, ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाशी १५ वर्षांची असलेली साथ सोडली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीकेची झोड उठवत त्यांनी आघाडी तोडली आणि स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. जागा वाटपात राष्ट्रवादीला १४४ जागा हव्या होत्या. काँग्रेसने राष्ट्रवादीचे म्हणणे मान्य केले नाही. आणि आघाडी तुटली.

भाजप-शिवसेना युती तुटल्यानंतर पवार यांनी लगेच आघाडी तोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता लढाई भाजप विरुद्ध शिवसेना आणि काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशी झाली आहे. गेल्या १५ वर्षातील सरकारच्या कामाबद्दल जनतेच्या मनातील राग म्हणजे सरकार विरोधी लाट पवारांच्या या खेळीमुळे संपूर्ण नष्ट झाली.आता सरळ पाच पक्ष निवडणूक रिंगणात असून प्रत्येकाला आपली ताकद दाखविण्याची संधी आहे.

पवारांचा जीवनपट  

केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी झाला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे अध्यक्ष आहेत.

शरद पवार, तारिक अन्वर आणि पीए संगमा यांनी या पक्षाची स्थापना केली होती. हे तीनही राजकारणी आधी काँग्रेस पक्षात होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेचं मुख्य कारण हे होतं की, शरद पवार, तारिक अन्वर आणि पीए संगमा यांचा सोनिया गांधी यांना विरोध होता, आणि हा विरोध सोनिया गांधी या मूळच्या इटलीच्या आहेत, परदेशी आहेत म्हणून होता.

सोनिया गांधी परदेशी असल्याच्या मुद्यावरून 20 मे 1999 रोजी शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले, आणि 25 मे 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शरद पवारांनी स्थापना केली.

शरद पवार यांनी संरक्षण मंत्रीपदही भूषवलं आहे, त्यांनी म्हाडामधून लोकसभा निवडणूक लढवली होती.

शरद पवार हे 2005 ते 2008 या काळात बीसीसीआयचे अध्यक्षही होते, 2010 मध्ये शरद पवार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष झाले, आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात शरद पवार यांनी 1967 मध्ये केली.

यशवंतराव चव्हाण यांना शरद पवारांचे राजकीय गुरू म्हटलं जातं. 1978 मध्ये जनता पार्टीच्या आघाडी सरकारमधून त्यांना पहिल्यांदा काँग्रेसने निलंबित केलं होतं. या आघाडीमुळे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. लोकसभेसाठी 1984 साली पहिल्यांदा ते बारामतीमधून निवडून आले होते.

1987 साली शिवसेनेचा प्रभाव वाढला, आणि त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1993 साली ते चौथ्यांदा राज्याचे मुख्यमंत्रीपदी आले. हा काळ त्यांच्यासाठी सर्वात वादग्रस्त काळ ठरला.
2001 आणि 2002 दरम्यान त्यांच्यावर माफियांशी संबंध असल्याचा आरोप लागला. गहू घोटाळा आणि 2 जी स्पेक्ट्रम सारखे आरोप त्यांच्यावर लागत होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.