लग्नाला सोबत न नेल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

हिंगोलीत 16 वर्षाच्या शाळकरी मुलानं आत्महत्या केलीये. शुभम जावळं असं या मुलाचं नाव आहे. 

Updated: Apr 4, 2016, 08:42 AM IST
लग्नाला सोबत न नेल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या title=

हिंगोली : हिंगोलीत 16 वर्षाच्या शाळकरी मुलानं आत्महत्या केलीये. शुभम जावळं असं या मुलाचं नाव आहे. 

त्यानं नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. पालकांनी लग्नाला सोबत नेलं नाही म्हणून राग येऊन शुभमनं टोकाचं पाऊल उचललं. हिंगोली तालुक्यातील सवड गावात ही धक्कादायक घटना घडलीये. 

शुभमनं गळफास लाऊन आत्महत्या केलीये. हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आलीये.