गोवंश हत्या बंदीचा निर्णयाचा फेरविचार करावा - अजित पवार

महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदीचा निर्णयाचा फेरविचार करण्याचं आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारला केलंय. 

Updated: May 8, 2016, 02:25 PM IST
गोवंश हत्या बंदीचा निर्णयाचा फेरविचार करावा - अजित पवार title=

अहमदपूर : महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदीचा निर्णयाचा फेरविचार करण्याचं आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारला केलंय. 

या कायद्यामुळे भाकड आणि वयस्कर जनावरांचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. ते दुष्काळग्रस्त लातूरच्या दौऱ्यावर अहमदपूरमध्ये बोलत होते. 

उच्च न्यायालयाने गोवंश बंदी असताना परराज्यातून मांस खाण्यास दिलेली सूट हे राज्य सरकारचं अपयश असल्याची टीका ही त्यांनी यावेळी केली.
 
लातूर शहराचा पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटविण्यासाठी सोलापूर जिल्ह्याच्या उजनी धरणातून लातूरला पाणी पुरवठा करण्याची मागणीही यावेळी अजितदादांनी केली.