पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

संगमनेर तालुक्यातील पेमरेवाडी येथे, बारावीचे काही पेपर अवघड गेले. म्हणून एका विद्यार्थ्याने झाडाला गळफास लावून घेतला. 

Updated: Mar 1, 2016, 12:41 AM IST
पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या title=

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील पेमरेवाडी येथे, बारावीचे काही पेपर अवघड गेले. म्हणून एका विद्यार्थ्याने झाडाला गळफास लावून घेतला. 

डोंगरे यांच्याच शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने त्याने गळफास घेतल्याचे आढळले. पोलीस पाटील विजय पोखरकर यांनी तातडीने घारगाव पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

पोलीस सूत्रांची माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील भोजदरी येथील महाविद्यालयातील बारावीचा विद्यार्थी मयूर डोंगरेने गणित आणि इतर पेपर अवघड गेल्याचे शनिवारी वडिलांना सांगितले.