राज्यातील पहिला टोल नाका आज मध्यरात्रीपासून कायमचा बंद

राज्यातील पहिला टोल नाका अशी ओळख असलेला ठाण्यातील खारेगाव टोल नाका आजपासून कायमचा बंद होणार आहे. आज मध्यरात्रीपासून हा टोलनाका बंद करण्यात येणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 13, 2017, 12:21 PM IST
राज्यातील पहिला टोल नाका आज मध्यरात्रीपासून कायमचा बंद title=
संग्रहित छाया

मुंबई : राज्यातील पहिला टोल नाका अशी ओळख असलेला ठाण्यातील खारेगाव टोल नाका आजपासून कायमचा बंद होणार आहे. आज मध्यरात्रीपासून हा टोलनाका बंद करण्यात येणार आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावरील  या रस्त्याच्या उभारणी आणि देखभालीचा खर्च वसूल झाल्याचं आयआरबी कंपनीनं म्हटलंय. त्यामुळे सरकारनं हा टोल नाका बंद करण्याचे आदेश दिलेत. 

1998 साली या टोलनाक्याची उभारणी केली होती. हा टोलनाका बंद झाल्यानं वाहनचालकांची टोलच्या कटकटीतून सुटका झाली आहे.