'नरेंद्र' मोदी म्हणजे 'मौनेंद्र' - पृथ्वीराज चव्हाण

निवडणुकीआधी बोलणारे नरेंद्र मोदी आता शांत का झाले आहेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मौनेंद्र मोदी झाले आहेत, अशी टीका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी पहिल्यांदाच टीकेची तोफ डागली आहे.

Updated: Jul 29, 2014, 08:54 PM IST
'नरेंद्र' मोदी म्हणजे 'मौनेंद्र' - पृथ्वीराज चव्हाण title=

मुंबई : निवडणुकीआधी बोलणारे नरेंद्र मोदी आता शांत का झाले आहेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मौनेंद्र मोदी झाले आहेत, अशी टीका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी पहिल्यांदाच टीकेची तोफ डागली आहे.

नरेंद्र मोदी यांची प्रवृत्ती ही हुकूशमशहाचीच असल्याचंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. निकोप लोकशाहीसाठी हे अत्यंत घातक असल्याचंही यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. चव्हाण यांनी 'पीटीआय'शी बोलताना मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका केलीय.

मोदींनी निवडणुकीपूर्वी  जी स्वप्ने दाखविली होती. ती आता भंगली आहेत. त्यामुळेच उत्तरखंडमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत लोकांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यांनी भाजपला नाकारून कॉंग्रेसच्या पारड्यात आपले मत टाकले, असे सांगून चव्हाण म्हणाले, गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना मोदींची कार्यपद्धती हुकूमशहासारखी होती.

हे काँग्रेसला माहिती होते. त्यामुळे पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिल्लीतही हुकूमशाही येण्याचा धोका व्यक्त केला होता. आता हे सर्व लोकांसमोर आले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्र्यांना कसे वागविले जाते, मंत्र्यांना किती स्वातंत्र्य दिले जाते, कोअर टीममध्ये कोण कोण मंत्री आहेत, या सगळ्यावरून हे स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले. 

पंतप्रधान नरेंद्र नव्हे, मौनेंद्र मोदी असल्याची टीकाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. मोदी यांनी परराष्ट्र धोरण, आर्थिक धोरण, सामाजिक विषय, समान नागरी कायदा, राम मंदिर, कलम ३७० यावर आपले मत स्पष्टपणे मांडलेले नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्यांनी केवळ लोकांना स्वप्न दाखविण्याचे काम केल्याचे चव्हाण यांनी म्हटलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.