तीन महिन्याच्या मुलीचा घेतला आई-वडिलांनीच जीव

माणुसकीला काळिमा फासणारी घटना मुंबईत घडली आहे. आपल्या ३ महिन्याच्याच मुलीला मारहाण केली, आणि त्यात त्या मुलीचा मृत्यू झाला आहे.

Updated: Oct 3, 2012, 08:57 PM IST

www.24taas.com, मुंबई
माणुसकीला काळिमा फासणारी घटना मुंबईत घडली आहे. आपल्या ३ महिन्याच्याच मुलीला मारहाण केली, आणि त्यात त्या मुलीचा मृत्यू झाला आहे. आहुती जोशी या तीन महिन्याच्या मुलीचा आई-वडिलांच्या मारहाणीत संशयास्पदरित्या मृत्यू झालाय. तसंच आहुती जोशीच्या मृत्यू अगोदर तिच्या जुळ्या बहिणीचा जन्मानंतर 15 दिवसांत गुदमरून मृत्यू झाला होता. या दोन्हीही जुळ्या बहिणींचा मृत्यू स्त्री भ्रूण हत्येचा प्रकार असल्याचं केईएमच्या फॉरेन्सिक अहवालात उघड झालंय. कोणते आई-वडील आपल्याच मुलाशी क्रूरकर्मा सारखे वागू शकतात. कोणते आई-वडील मुलीचा जीव घेऊ शकतात. हे सत्य आहे आहुती जोशी या तीन महिन्याच्या मुलीला तिचे वडील कल्पेश आणि आईच्या मारहाणीत संशयीतरित्या मृत्यू झालायं.
आहुतीला केईएम रूग्णालयात 24 सप्टेंबरला दाखल केल गेलं.त्यावेळी तीच्या डोक्याच्या दोन्ही भागाना मार लागला होता.तर छातीच्या बरगडयाना फँक्चर झाल्यान. अहुती जोशीच्या शरीरात आतून रक्तस्त्राव झाल्यामुळे तीचा मृत्यू झाल्याच. केईएमच्या डॉक्टराच्या फोरेन्सिक अहवालातन उघड झालयं. आहुती जोशीच्या मृत्यू अगोदर तीच्या जुळया जन्मानंतर बहीणीचा 15 दिवसात गुदमरून मृत्य झाला होता.या जुळया बहीणीचा मृत्यू स्त्री भूण हत्येचा प्रकार असल्याच केईएमच्या डॉक्टराच म्हणण आहे.
अहुती जोशीच्या मृत्यूचा फोरेन्सिक अहवाल केईएमच्या डॉक्टरानी मुंबई पोलिसकडे दिलायं.निष्पाप अहुतीच्या मृत्यून बोरीवली गोराई परिसरात खळबळ निर्माण झालीयं.बोरीवली पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यास सुरवात केलीयं.