नागपुरात तरी गुन्हे कमी झाले आहेत का?, अजित पवारांचा सवाल

राज्यातील कायदा सुव्य़वस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न यावरुन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. नागपुरात तरी गुन्हे कमी झाले आहेत का?, असा सवाल करत त्यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. 

Updated: Mar 12, 2015, 07:13 PM IST
नागपुरात तरी गुन्हे कमी झाले आहेत का?, अजित पवारांचा सवाल title=

मुंबई: राज्यातील कायदा सुव्य़वस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न यावरुन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. नागपुरात तरी गुन्हे कमी झाले आहेत का?, असा सवाल करत त्यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. 

दिवसाढवळ्या गोळीबार होतायेत, पोलीस ड्रग्जमध्ये अडकले आहेत, हे सांगतानाच सरकारमधील शिवसेनेच्या मंत्र्यांची अवस्था बघवत नसल्याची टीकाही त्यांनी केलीय. 

सावकारांकडून शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज माफ करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा फसवी असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.