वेळ पडल्यास पाकिस्तान ताब्यात घ्या - आठवले

काश्मीर मुद्द्यावर आता रिपाई नेते रामदास आठवले यांनी आपलं मत मांडलंय.  

Updated: Apr 17, 2016, 04:13 PM IST
वेळ पडल्यास पाकिस्तान ताब्यात घ्या - आठवले title=

मुंबई : काश्मीर मुद्द्यावर आता रिपाई नेते रामदास आठवले यांनी आपलं मत मांडलंय.  

पाकव्याप्त काश्मिरचा ताबा मिळवण्यासाठी सरकारनं प्रयत्न करण्याची गरज आहे असं मत आठवले यांनी केलंय. तसेच वेळ पडल्यास पाकिस्तानचाही ताबा मिळवावा अस आठवले म्हणालेत. 

जम्मू-काश्मिरमध्ये पीडीपी अफजल गुरूला शहीद म्हणत असेल तर ते चुकीचे आहे. भारतातला दहशतवाद वाढण्यास पाकिस्तान जबाबदार असल्याचंही ते  म्हणाले. यादरम्यान त्यांनी वेगळा विदर्भाचंही समर्थन केलंय