युती तुटल्यावर मुख्यमंत्री ट्विटरवर म्हणाले....

 सत्ता हे साध्य नाही तर साधनविकासाचे आहे, पारदर्शी कारभार हाच आमचा मूलमंत्र आहे.  जे येतील त्यांच्यासोबत जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय परिवर्तन तर होणारच असे ट्विट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती तुटल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 26, 2017, 08:29 PM IST
 युती तुटल्यावर मुख्यमंत्री ट्विटरवर म्हणाले....  title=

मुंबई :  सत्ता हे साध्य नाही तर साधनविकासाचे आहे, पारदर्शी कारभार हाच आमचा मूलमंत्र आहे.  जे येतील त्यांच्यासोबत जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय परिवर्तन तर होणारच असे ट्विट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती तुटल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 
 
 गोरेगाव येथील शिवसेना मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तुटल्याची घोषणा केली.  त्यानंतर सर्वांचे लक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रियेकडे होते. 

 
 त्यांनी माध्यमांशी न बोलता ट्विटरवर आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.