महात्मा गांधींच्या पत्रांचा लिलाव

राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या दोन दुर्मिळ पत्रांचा लिलाव करण्यात आला.

Updated: Apr 29, 2014, 10:04 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या दोन दुर्मिळ पत्रांचा लिलाव करण्यात आला. महात्मा गांधींची ही दोन्ही पत्रं अनुक्रमे ११.५ आणि ९ लाखांना विकण्यात आली. हा लिलाव मुंबईतील `विवांता बाय ताज` हॉटेलमध्ये करण्यात आला.
महात्मा गांधींची ही पत्रे गुजराती भाषेत आहेत. गांधी पत्रात लिहितात की, "आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून कार्य करा. इतर लोक काय सल्ला देतात हा धर्म नाही. स्वत:च्या मनात ज्या गोष्टीबद्दल विश्वास असतो, तोच धर्म आहे. दुसरे कोणी तुमच्या मनातील कसे काय ओळखू शकतं? त्यामुळे इतरांवर विश्वास न ठेवता, आपला रस्ता ओळखण्यास मदत व्हावी एवढीच प्रार्थना देवाकडे करा. तोच खरा मार्गदर्शक आहे."
या दुर्मिळ पत्रांचा लिलाव १ ते २ लाख रुपयांत होणार असे वाटत होते. यातील पहिले पत्र महात्मा गांधींनी आपल्या नात्यातील एका तरुणाला वर्धा येथून १० ऑगस्ट १९३५ साली लिहिले होते. तर दुसरे पत्र गांधीजींच्या एका सहकाऱयाने ५ ऑक्टोबर १९३५ साली लिहिलेले आहे. हे पत्र देखील गुजराती भाषेत असून यावर महात्मा गांधींची स्वाक्षरी आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.