पेंग्विन मृत्यूवरून मनसेचा शिवसेनाला टोला

मुंबईतल्या पेंग्विनच्या मृत्यूवरून मनसे आणि शिवसेनेमध्ये कलगीतुरा रंगलाय. 

Updated: Oct 24, 2016, 04:42 PM IST
पेंग्विन मृत्यूवरून मनसेचा शिवसेनाला टोला  title=

मुंबई : मुंबईतल्या पेंग्विनच्या मृत्यूवरून मनसे आणि शिवसेनेमध्ये कलगीतुरा रंगलाय. 

मनसेचे नगसेवक संदीप देशपांडेंनी शिवसेनेला ये ते होना ही था असा टोला हाणलाय. आयुक्तांना पत्र लिहून उरलेले पेंग्विन परत मागवण्याची मागणी केलीय. 

बालहट्टापायी 25 कोटींचा चुराडा करण्यात आल्याची टीकाही त्यांनी पत्रातून केलीय. तर तिकडे उद्धव ठाकरेंनी मनसेला जोरदार प्रत्तुतर दिलंय. जे पेग्विनला वाचवण्यासाठी परत पाठवा असं म्हणणाऱ्यांनी आपला पक्ष आधी सांभाळावा असं उद्धव ठाकरेंनी म्हटलयं.