... तर मुंबईमध्येही लागू होणार सम-विषम फॉर्म्युला!

केजरीवाल सरकारनं दिल्लीत लागू केलेला सम-विषम गाडी क्रमांकांचा फॉर्म्युला शहरात यशस्वी ठरला तर तो लवकरच मुंबईतही लागू करण्यात येऊ शकतो. 

Updated: Jan 7, 2016, 01:53 PM IST
... तर मुंबईमध्येही लागू होणार सम-विषम फॉर्म्युला! title=

मुंबई : केजरीवाल सरकारनं दिल्लीत लागू केलेला सम-विषम गाडी क्रमांकांचा फॉर्म्युला शहरात यशस्वी ठरला तर तो लवकरच मुंबईतही लागू करण्यात येऊ शकतो. 

महाराष्ट्रातही हा फॉर्म्युला लागू करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीनं केली होती. त्याला उत्तर देताना महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिलीय. 

महाराष्ट्र सरकार या योजनेवर नजर ठेवून आहे. जर ही योजना दिल्लीत यशस्वी ठरली तर काही बदलांसहीत महाराष्ट्र सरकारही ही योजना लागू करेल, असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय. 

सम-विषम फॉर्म्युला मुंबईतही लागू झाला तर रस्त्यावर जवळपास ५० टक्के प्रदूषण कमी होईल.