राजू शेट्टी जातीयवादीच, आव्हाडांची टीका

राजू शेट्टींच्या महायुतीतल्या समावेशावर राष्ट्रवादी काँग्रेसनं टीका केलीय. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा खरा चेहरा उघड झालाय. जातीयवादी पक्षांबरोबर जावून आपण जातीयवादी असल्याचं त्यांनी दाखवून दिल्याची टीका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केलीय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 7, 2014, 07:21 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राजू शेट्टींच्या महायुतीतल्या समावेशावर राष्ट्रवादी काँग्रेसनं टीका केलीय. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा खरा चेहरा उघड झालाय. जातीयवादी पक्षांबरोबर जावून आपण जातीयवादी असल्याचं त्यांनी दाखवून दिल्याची टीका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केलीय.
आज महायुतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रूपानं नवा भिडू सामील झाला आहे. लोकसभेसाठी हातकणंगले आणि माढा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात येणार आहे. राजू शेट्टी यांनी आज मातोश्रीवर जावून उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी हे एकमेव खासदार मागील निवडणुकीत निवडून आले होते. मात्र मागील दोन वर्षापासून राजू शेट्टी यांनी केलेल्या आंदोलनानंतर, गावोगावी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं नाव पोहोचलं आहे.
या निवडणुकीत अनेकांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती, मात्र राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला फक्त दोन जागा देण्यात आल्या आहेत. यापैकी हातकणंगले मतदारसंघहा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे आहे, तर माढा मतदार संघातून यापूर्वी शरद पवारांनी निवडणूक लढवली होती. त्यामुळं आता राष्ट्रवादीनं जातीयवादी म्हणत राजू शेट्टीवर तोंडसूख घेतलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.