पाऊस असा बरसला... मुंबईकर झाले आनंदानं ओलेचिंब!

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी... मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी पहिला तलाव भरून वाहायला लागलाय.

Updated: Jul 19, 2016, 05:21 PM IST
पाऊस असा बरसला... मुंबईकर झाले आनंदानं ओलेचिंब! title=

मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी... मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी पहिला तलाव भरून वाहायला लागलाय.

रात्रभरात झालेल्या दमदार पावसामुळे तुलसी तलाव ओव्हर फ्लो झालाय. काल संध्याकाळपासून मुंबईत दमदार पाऊस सुरू आहे. चार दिवसांच्या गॅपनंतर आलेल्या या पावसामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्ह आहेत. 

पाणी साचलं...

नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरात पावसाने हजेरी लावली. रात्रभर पावसाची संतत धार बरसत होती. सकाळपासून पावसानं चांगलाच जोर धरला. त्यामुळे सखल भागात पाणी साचण्याच्या किरकोळ घटना घडल्या. यामुळे रस्त्यावरील वाहतूक थंडावली.