अजित पवारांना आता संजय राऊतांचा टोला

क्रिकेटवर प्रेम आहे म्हणून लगेच क्रिकेट बोर्डावर जाण्याची गरज काय ? बाळासाहेब, उद्धव ठाकरेसुद्धा क्रिकेटवर प्रेम करतात. पण, म्हणून लगेच ते क्रिकेट बोर्डावर जाऊन बसले नाहीत. तिथं काँग्रेसचीच लोकं दिसतात.असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

Updated: Nov 21, 2011, 10:24 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

क्रिकेटवर प्रेम आहे म्हणून लगेच क्रिकेट बोर्डावर जाण्याची गरज काय ? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. बाळासाहेब, उद्धव ठाकरेसुद्धा क्रिकेटवर प्रेम करतात. पण, म्हणून लगेच ते क्रिकेट बोर्डावर जाऊन बसले नाहीत. तिथं काँग्रेसचीच लोकं दिसतात. त्यांनी आम्हाला क्रिकेट शिकवू नये. असा टोलाही संजय राऊत यांनी अजित पवारांना लगावलाय.