'...तर पाडगावकरांच्या आधी मोदींना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली असती'

पुरस्कार वापसीवरुन वातावरण तापलेलं असतानाच मराठी साहित्य संमेलनाचे नियोजीत अध्यक्ष श्रीपाल सबनिस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय. 

Updated: Jan 1, 2016, 04:57 PM IST
'...तर पाडगावकरांच्या आधी मोदींना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली असती' title=

पिंपरी : साहित्यिक आणि वाद हे समिकरण नवीन नाही. पुरस्कार वापसीवरुन वातावरण तापलेलं असतानाच मराठी साहित्य संमेलनाचे नियोजीत अध्यक्ष श्रीपाल सबनिस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय. 

मोदी पाकिस्तानात अचानक गेले. तिथं त्यांना गोळी लागली असती तर पाडगावकरांच्या अगोदर मोदीवर श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली असती....अशी मुक्ताफळं सबनिस यांनी उधळलीयेत. 

ते इथंच थांबले नाहीतर गोधरा हत्याकांडचा विषयही त्यांनी उकरुन काढली. गोधरा हत्याकांडात मोदी कलंकीत आहेत. अशंही सबनिस म्हणाले. सबनिसांची आत्ताची मुक्ताफळं पाहता. आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या भाषणात सबनिस काय आणखी काय मुक्ताफळं उधळणार याकडं अनेकांचं लक्ष लागलंय.