भारत सीरिज जिंकण्याच्या उंबरठ्यावर, विजयासाठी १०६ रन्सची आवश्यकता

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये भारत विजयाच्या उंबरठ्यावर आहे. शेवटच्या इनिंगमध्ये भारताला जिंकण्यासाठी १०६ रन्सची आवश्यकता आहे.

Updated: Mar 27, 2017, 04:26 PM IST
भारत सीरिज जिंकण्याच्या उंबरठ्यावर, विजयासाठी १०६ रन्सची आवश्यकता title=

धर्मशाला : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये भारत विजयाच्या उंबरठ्यावर आहे. शेवटच्या इनिंगमध्ये भारताला जिंकण्यासाठी १०६ रन्सची आवश्यकता आहे.

दुसऱ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा डाव १३७ रन्सवर ऑलआऊट झाला. भारताच्या उमेश यादव, रवींद्र जडेजा आणि आर. अश्विननं प्रत्येकी तीन विकेट घेतल्या तर भुवनेश्वर कुमारला एक विकेट मिळाली. ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलनं सर्वाधिक ४५ रन्स केल्या.

त्याआधी तिसऱ्या दिवसाची सुरुवात २४८/६ अशी करणाऱ्या भारताला ३३२ रन्सपर्यंत मजल मारता आल्यामुळे ३२ रन्सचा लीड मिळाला. रवींद्र जडेजानं केलेल्या ६३ रन्समुळे भारताला ही महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली.

चार टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये पुण्यातली पहिली टेस्ट कांगारूंनी जिंकल्यावर भारतानं बंगळुरूमध्ये कमबॅक केलं तर रांचीमधली तिसरी टेस्ट ड्रॉ झाली. यामुळे ही मॅच जिंकत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी पुन्हा आपल्याकडे घेण्याची चांगली संधी आता भारतापुढे आहे.