बांगलादेशला भारतीय फॅन्सचे चोख प्रत्युत्तर

पाकिस्तानला हरवल्यानंतर टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताची पुढची लढत बांगलादेशशी होत आहे.

Updated: Mar 21, 2016, 02:05 PM IST
बांगलादेशला भारतीय फॅन्सचे चोख प्रत्युत्तर title=

नवी दिल्ली : पाकिस्तानला हरवल्यानंतर टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताची पुढची लढत बांगलादेशशी होत आहे. आशिया कप स्पर्धेदरम्यान मैदानाबाहेर भारतीय आणि बांगलादेशच्या फॅन्समध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली होती. बांगलादेश आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचल्यानंतर भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे शिर हातात घेतलेला फोटो व्हायरल झाला होता.

आशिया कपच्या फायनलमध्ये बांगलादेशला हरवल्यानंतर भारतीय फॅन्सनीही बांगलादेशच्या फॅन्सचा चांगलेच प्रत्युत्तर दिले होते. टी-२० वर्ल्डकपमध्ये आता २३ मार्चला सामना होतोय. त्यापूर्वीच हा व्हिडीओ चांगलाच बघितला जातोय. 

फोटोशॉपवरुन बांगलादेशच्या फॅन्सना क्रिकेटच्या चाहत्यांनी दिलेली चपराकच म्हणावी लागेल.