कोहली-विजयच्या सेंच्युरीमुळे भारत भक्कम स्थितीत

मुरली विजय आणि विराट कोहलीच्या शानदार सेंच्युरीमुळे मुंबई कसोटीमध्ये भारत भक्कम स्थितीत पोहोचला आहे.

Updated: Dec 10, 2016, 04:59 PM IST
कोहली-विजयच्या सेंच्युरीमुळे भारत भक्कम स्थितीत  title=

मुंबई : मुरली विजय आणि विराट कोहलीच्या शानदार सेंच्युरीमुळे मुंबई कसोटीमध्ये भारत भक्कम स्थितीत पोहोचला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 451/7 एवढा होता. दिवसाच्या शेवटी विराट कोहली नाबाद 147 रनवर तर जयंत यादव नाबाद 30 रनवर खेळत आहे.

तिसऱ्या दिवसाची सुरुवात 146/1 वर करताना मुरली विजयनं आधी चेतेश्वर पुजारा आणि मग कोहलीबरोबर पार्टनरशीप करून भारताच्या डावाला आकार दिला. चेतेश्वर पुजारा 47 रनवर आऊट झाला, तर विजयनं 136 रनची खेळी केली. भारताकडे आता 51 रनची आघाडी आहे.