मुरलीनंतर विराटचेही दमदार शतक

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी भारताच्या दोन फलंदाजांनी वानखेडे मैदानावर शतके झळकावली. 

Updated: Dec 10, 2016, 03:12 PM IST
मुरलीनंतर विराटचेही दमदार शतक title=

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी भारताच्या दोन फलंदाजांनी वानखेडे मैदानावर शतके झळकावली. 

सलामीवीर मुरली विजयनंतर कसोटी कर्णधार विराट कोहलीनेही शतक झळकावले. या दोघांच्या शतकाच्या जोरावर भारताने 370हून अधिक धावांचा टप्पा पार केलाय. 

कसोटी कारकिर्दीतील विराटचे हे 15 वे शतक आहे. मुरली विजयने पहिल्या सत्रात शानदार शतकाची नोंद केली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात विराटनेही शतकी खेळी करताना भारताला चांगली धावसंख्या गाठून दिली.