पराभवानंतर कॅप्टन कूल धोनी भारतीय बॅट्समनवर बरसला

खराब प्रदर्शनामुळे टीम इंडियाच्या बॅट्समनची कॅप्टन कूल धोनीनं चांगलीच धुलाई केल्याचं कळतंय. धोनी चिडला आणि त्यानं सर्व खेळाडूंना जर आपण आपल्यातील कमी दूर केली नाही आणि जोडीनं विकेट गमावल्याचं म्हटलंय.

Updated: Oct 6, 2015, 09:33 AM IST
पराभवानंतर कॅप्टन कूल धोनी भारतीय बॅट्समनवर बरसला title=

कटक: खराब प्रदर्शनामुळे टीम इंडियाच्या बॅट्समनची कॅप्टन कूल धोनीनं चांगलीच धुलाई केल्याचं कळतंय. धोनी चिडला आणि त्यानं सर्व खेळाडूंना जर आपण आपल्यातील कमी दूर केली नाही आणि जोडीनं विकेट गमावल्याचं म्हटलंय.

आणखी वाचा - भारतावर दक्षिण आफ्रिकेचा ६ गडी राखून विजय, मालिका खिशात

टीम इंडियानं कटकमध्ये झालेली दुसरी टी-२० मॅच गमावत दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सीरिज गमावलीय. पटापट विकेट गमावत टीम इंडियाची ९२ रन्सवर  अवघ्या १७.२ ओव्हर्समध्येच ऑलआऊट झाली. आतापर्यंतचा हा टी-२० क्रिकेटमधील दुसरा सर्वात कमी स्कोअर ठरला. यापूर्वी २००८मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मॅचमध्ये यापेक्षाही कमी स्कोअर होता.

आणखी वाचा - ... जेव्हा विराट कोहलीनं रैनाची कॅच सोडली

धोनीनं मॅचनंतर म्हटलं, 'मला वाटतं आम्ही चांगलं क्रिकेट खेळलो नाही. आम्ही जोडीनं विकेट गमावल्या. यात आम्ही सुधारणा केली नाही.' गोलंदाजांबाबत बोलणं मात्र धोनीनं टाळलं कारण त्यांना खूप स्कोअर बनवायचा होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.