आफ्रिदीने टीम इंडियाला उत्तर देण्याचा 'मौका' साधला

वर्ल्डकप स्पर्धेत स्टार क्रिकेटची "मौका मौका" ही सिरीज चांगलीच गाजली, यात प्रत्येक वेळी पाकिस्तानला कशी मात टीम इंडियाने दिलीय, यावर जोर देण्यात आला. मात्र ऑस्ट्रेलियाशी सेमी फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर, या "मौका-मौका"चा टीम इंडियावर बुमरँग होण्यास सुरूवात झाली आहे.

Updated: Apr 1, 2015, 01:43 PM IST
आफ्रिदीने टीम इंडियाला उत्तर देण्याचा 'मौका' साधला title=

इस्लामाबाद : वर्ल्डकप स्पर्धेत स्टार क्रिकेटची "मौका मौका" ही सिरीज चांगलीच गाजली, यात प्रत्येक वेळी पाकिस्तानला कशी मात टीम इंडियाने दिलीय, यावर जोर देण्यात आला. मात्र ऑस्ट्रेलियाशी सेमी फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर, या "मौका-मौका"चा टीम इंडियावर बुमरँग होण्यास सुरूवात झाली आहे.

ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या भारताच्या पराभवाबद्दल शाहीद आफ्रिदीला जेव्हा विचारलं, तेव्हा त्याने "मौका मौका"च्या शैलीत टीम इंडियाला उत्तर दिलं.

यापूर्वीही  भारताच्या पराभवानंतर बीसीसीआयच्या कार्यालयात पाकिस्तान आणि बांगलादेशातून दोनशे कॉल आले होते. याला वैतागून बीसीसीआने आपला फोन डिसकनेक्ट केला होता. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.