अवकाशातील भरारीनंतर समुद्राचा तळ गाठणार; चांद्रयान 3 नंतर आता भारताचे Matsya 6000 मिशन 'समुद्रयान'

समुद्रातील संशोधनासाठी केंद्र सरकारने ‘समुद्रयान’ ही मोहीम हाती घेतली आहे.  खोल समुद्रातील खनिज संसाधनांचा शोध या मोहिमेच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. 

Aug 06, 2023, 17:33 PM IST

Samudrayaan Mission:  भारताच्या चांद्रयान 3 याने अवकाशात उत्तुंग भरारी घेतली आहे. यानंतर आता भारत सुमद्राचे तळ गाठण्यासाठी सज्ज झाला आहे. चांद्रयान 3 नंतर आता भारताच्या Matsya 6000 या मिशन 'समुद्रयान' याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारताची ही पहिली मानवयुक्त सागरी मोहीम आहे. Matsya 6000 पाणबुडीच्या माध्यमातून तीन व्यक्तींनी समुद्राच्या  6,000 मीटर खोलीपर्यंत नेले जाणार आहे. 

 

1/6

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन  टेक्नॉलॉजीच्या (NIOT) माध्यमातून ‘समुद्रयान’ मोहिम राबवली जाणार आहे. 

2/6

आतापर्यंत भारताच्या मानवयुक्त पाणबुड्या या 200 मीटर पंर्यंत संशोधन करु शकल्या आहेत. मात्र, प्रथमच  MATSYA 6000 पाणबुडी तीन व्यक्तींनी  6,000 मीटर खोलीपर्यंत घेऊन जाणार आहे. 

3/6

2026 पर्यंत   MATSYA 6000  ही पाणबुडी खोल समुद्रात संशोधन करणार. या मोहिमेचा पहिला टप्प 2024 मध्ये सुरु होणार आहे. 

4/6

MATSYA 6000  या पाणबुडीत तीन जणांना खोल समुद्रात पाठवले जाणार आहे. ही पाणबुडी मॅगनीज, कोबाल्ट आणि इतर दुर्मीळ घटकांचा खोल समुद्रातील खनिज संसाधनांचा शोध घेणार आहे.  

5/6

अमेरिका, रशिया, जपान, फ्रान्स आणि चीन सारख्या देशांच्या बरोबरीने आता भारत देखील आपल्या  ‘समुद्रयान’ मोहिमेच्या माध्यमातून खोल समुद्रात संशोधन करणार आहे.  

6/6

मत्स्य 6000’ ( MATSYA 6000 Deep Submergence Vehicle ) या पाणबुडीच्या माध्यमातून समुद्रात खोलवर जाऊन खनिजांचा शोध घेतला जाणार आहे. NIOT ने ही स्वदेशी पाणबुडी विकसीत केली आहे.