मुकेश अंबानींनी आकाशला विचारला एक प्रश्न; तिथूनच सुरू झाली 'रिलायन्स जिओ'ची कहाणी

अशी झाली जिओ रिलायन्सची सुरूवात 

Dakshata Thasale | Dec 24, 2020, 11:04 AM IST

मुंबई : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानीची (Nita Ambani) ची तीन मुलं. इशा आणि आकाश अंबानी ही जुळी मुलं तर अनंत अंबानी हा या दोघांपेक्षा ३ वर्षांनी लहान. इशा (Isha Ambani) आणि आकाश (Akash Ambani) दोघं रिलायन्स जिओ (Reliance Jio)ची जबाबदारी सांभाळतात. 

1/8

आकाश अंबानीने एका मुलाखतीत Reliance Jio ही कंपनी कशी सुरू झाली याची गोष्ट सांगितली. मुकेश अंबानी यांनी आकाश अंबानीला ही कंपनी सुरू करण्यासाठी कसं प्रोत्साहन दिलं ते देखील त्याने सांगितलं.   

2/8

आकाश अंबानीने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं की, अमेरिकेतील ब्राऊन युनिर्व्हसिटीमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर अमेरिकेतच राहू इच्छित होता.   

3/8

आकाशला एक दिवस मुकेश अंबानी भेटायला आहे. त्यांनी आकाशला त्याचा व्यवसायाबद्दल काय विचार आहे? असा प्रश्न केला. त्यावर आकाशने आपल्याला अमेरिकेतच राहायचं असं सांगितलं.

4/8

मुकेश अंबानींनी आकाशचं संपूर्ण बोलणं ऐकल्यानंतर दुसरा प्रश्न विचारला की,'तू दिवसभर इंटरनेटवर काय करतोस?' त्यावर तो म्हणाला की,'वाचतो, काही नवीन शिकतो आणि ज्ञानात भर पाडतो.'

5/8

आकाशला अंबानीला उत्तर देताना मुकेश अंबानी म्हणाले की, तुला असं नाही वाटतं की, भारताची सव्वा करोड जनतेने पण हेच करावं. 

6/8

आकाश अंबानीने 'हो' उत्तर दिलं आणि तेथेच 'जिओ टेलिकॉम'चा जन्म झाला. आणि हे सांभाळण्यासाठी आकाशला भारतात बोलावलं. 

7/8

यानंतरच आकाश आणि इशा या दोघांनी जिओची जबाबदारी स्विकारली. 

8/8

जिओ देशातील सर्वात जास्त वापरली जाणारी टेलीकॉम सर्व्हिस प्रोवाडर आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x