PHOTO: काहीही खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका? आरोग्यावर होतो परिणाम, पाणी पिण्याची योग्य वेळ काय?

Drinking Water After Meal Side Effects: तुम्हीही अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास तुम्हाला बद्धकोष्ठता आणि गॅससह अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

| Aug 06, 2024, 11:35 AM IST

Drinking Water After Meal Side Effects: 'पाणी हेच जीवन आहे' हे सर्वांनाच माहीत आहे. पाण्याशिवाय जगण्याची कल्पनाच करता येत नाही. पिण्याच्या अनेक गोष्टी असल्या तरी पाणी जे काम करते ते दुसरे कोणतेही पेय करू शकत नाही. पाणी आरोग्यासाठी देखील महत्वाचे आणि फायदेशीर आहे, परंतु काहीवेळा ते तुमच्यासाठी त्रासाचे कारण बनू शकते. त्यापैकी एक म्हणजे अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे. 

अनेकदा लोक जेवल्यानंतर लगेच पाणी पितात, पण असे केल्याने तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. खरं तर, तुम्ही जेवल्यानंतर लगेच पाणी पितात, तेव्हा तुम्हाला पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. जेवल्यानंतर पाणी प्यायल्याने कोणत्या समस्या उद्भवू शकतात हे जाणून घेऊया.

1/7

जेवल्यानंतर लगेच पाणी का पिऊ नये?

अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. असे केल्याने पचनक्रिया कमजोर होते. जेवल्यानंतर पाणी प्यायल्यास अन्नातील पोषक तत्व पाण्यात विरघळतात आणि लघवीसोबत बाहेर पडतात. यामुळे शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळत नाहीत. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होतो. त्यामुळे तुम्हाला पोटाशी संबंधित अनेक समस्या होऊ लागतात. जाणून घेऊया जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने कोणत्या समस्या निर्माण होतात?

2/7

जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने त्रास होतो?

पचन समस्या जेव्हा तुम्ही अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी पितात तेव्हा त्याचा तुमच्या पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो. जेवल्यानंतर लगेचच पचनक्रिया मंदावते ज्यामुळे तुम्हाला अपचनासारख्या समस्या होऊ लागतात.

3/7

पोटात गॅस आणि फुगण्याची समस्या

जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पोटात गॅस आणि फुगण्याची समस्या होऊ शकते. असे होते कारण जेव्हा तुम्ही जेवल्यानंतर लगेच पाणी पितात, तेव्हा अन्न पचवणारे ऍसिड तयार होणे थांबते. ज्यामुळे तुम्हाला गॅस आणि ब्लोटिंगच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.

4/7

पोषण

अन्न खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने तुमचे शरीर पोषण योग्य प्रकारे शोषून घेऊ शकत नाही. त्यामुळे तुमच्या शरीराला पोषण मिळत नाही आणि तुम्हाला अशक्तपणाचा सामना करावा लागतो.

5/7

वजन कमी होण्याचा धोका

जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने वजन कमी होण्याची समस्या निर्माण होते.  जेवल्यानंतर पाणी प्यायल्याने अन्न एका जागी साचते. ज्यामुळे तुम्हाला भूक लागत नाही आणि तुमचे वजन झपाट्याने कमी होऊ लागते.

6/7

बद्धकोष्ठता समस्या

जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते. कारण जेवल्यानंतर तुमच्या पोटात पाणी शिरताच अन्नपदार्थ फुगतात, ज्यामुळे आतड्याची हालचाल कठीण होऊ शकते.  

7/7

पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जेव्हाही अन्न शरीरात जाते तेव्हा ते पचायला किमान दोन तास लागतात. त्यामुळे अन्न खाल्ल्यानंतर किमान 45 ते 60 मिनिटे पाणी प्यावे.