ढोल-ताशा ऐकायला आवडतं, पण या परंपरेचा इतिहास माहितीये का? 'या' व्यक्तीने सुरु केलं पहिलं पथक

महाराष्ट्रात गावोगावी ढोल-ताशा पथकं आहेत. पण काळाआड जाऊ पाहणाऱ्या या वाद्यांना आप्पा साहेब पेंडसेंनी पुन्हा वादक मिळवून दिले.

Aug 31, 2024, 17:24 PM IST

महाराष्ट्रात गावोगावी ढोल-ताशा पथकं आहेत. पण काळाआड जाऊ पाहणाऱ्या या वाद्यांना आप्पा साहेब पेंडसेंनी पुन्हा वादक मिळवून दिले.

1/7

मराठी संस्कृतीचा भाग

गणेशोत्सव जवळ आला की ताशाची तर्री संपूर्ण महाराष्ट्रभरात वाजायला लागते. ढोल-ताशा पथक मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. पण तुम्हाला ढोल-ताशा पथक ही संकल्पना कशी सुरु झाली हे माहित आहे का? 

2/7

सार्वजनिक गणेशोत्सवांचा हेतु

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव हे जनजागृतीसाठी सुरु केले होते, समाजातल्या सर्व स्तरांवरील लोकांना एकत्र आणून इंग्रजांविरुद्ध क्रांतिकारक तयार करणे हा मुख्य हेतु होता. त्याकाळात फक्त ठराविक जातीच्या लोकांना देऊळात प्रवेश मिळायचा म्हणून टिळकांनी मंदिराबाहेर सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करण्यास सूरुवात केली.

3/7

स्वातंत्र्योत्तर काळात रुपरेखा पालटली

मात्र स्वातंत्र्योत्तर काळात सार्वजनिक गणेशोत्सवांची रुपरेखा बदलू लागली, तरुणाई चूकीच्या मार्गावर जायला लागली. सार्वजनिक गणेशोत्सवांमधून आस्था,श्रध्दा निघून जाऊ लागली. टिळकांनी लावलेली शिस्त नाहीशी होऊ लागली होती.कोणीतरी पुढाकार घेऊन या भरकटत जाणाऱ्या उत्सवाचे स्वरुप सुधाराण्याची फार गरज होती.

4/7

विनायक विश्वनाथ पेंडसे

महाराजांच्या काळात ढोलासारखी रणवाद्ये वाजवली जायची. काळाच्या ओघात  बरची,ढोल,ताशा अशी वाद्ये मागे पडली. 1960 साली विनायक विश्वनाथ पेंडसे (आप्पा साहेब) यांनी पुण्यात ढोल-ताशा सारखी पारंपारीक वाद्ये तरुणांना ज्ञात करुन दिली. विशेष म्हणजे लोकांना शिकण्यात रस येऊ लागला

5/7

पहिला ठोका

पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये शिस्तबध्द पध्दतीत आप्पा साहेबांच्या नेतृत्तवाखाली ढोल-ताशा-ध्वज पथकाचा पहिला ठोका ज्ञानप्रबोधिनी मार्फत पडला. गणेशोत्सवात पुण्याच्या रस्त्यांवर भरपूर प्रमाणात गर्दी असते. गर्दीचे योग्य व्यवस्थापन करणे फार गरजेचे होऊन जाते, मात्र आप्पा साहेब पेंडसेंनी लावून दिलेली सूत्रबद्धता आजही रमणबाग , नादब्रम्ह आणि इतर बऱ्याचं पथकांच्या वादनात दिसून येते.

6/7

मुख्य उद्देश

अशी पथके सुरु करण्यामागचा मुख्य उद्देश शिस्तबध्द ,सर्जनशील,मदतसू युवा पिढी तयार करणे हा होता. आप्पा साहेब पेंडसेंनी फक्त पथक नाही तर शाळा,समाजसेवा गट,जनजागृती गट अश्या इतर शाखा ही सूरु केल्या त्यांना प्रचंड जनप्रतिसाद मिळाला.

7/7

गावोगावी ढोल वाजतात

आता महाराष्ट्रात गावोगावी पथके आहेत. पण काळाआड जाऊ पाहणाऱ्या या वाद्यांना आप्पा साहेब पेंडसेंनी पुन्हा वादक मिळवून दिले.