जगातील एकमेव असं मंदिर जिथे जिवंतपणी करतात स्वत:चं श्राद्ध, काय आहे आत्मश्राद्धामागील कारण?

Sarva Pitru Amavasya 2024 : पितृपक्ष पंधरवडा आणि सर्वपित्री अमावस्येला पूर्वजांच्या आत्म्यासाठी श्राद्ध, तर्पण, पिंड दान केलं जातं. पण आज आम्ही अशा मंदिराबद्दल सांगणार आहोत, जिथे लोक जिवंतपणी स्वत:चं श्राद्ध आणि पिंड दान करतात.  

नेहा चौधरी | Updated: Oct 2, 2024, 02:31 PM IST
जगातील एकमेव असं मंदिर जिथे जिवंतपणी करतात स्वत:चं श्राद्ध, काय आहे आत्मश्राद्धामागील कारण? title=
only temple in the world where people perform shradh they are alive janardan mandir gaya

Sarva Pitru Amavasya 2024 : हिंदू धर्मात अनेक सण आणि विधी सांगण्यात आलंय. हिंदू धर्मात पितृपक्ष पंधरवडा हा पितरांना समर्पित असतो. यादिवसांमध्ये शुभ कार्य करायचे नसतात. पण यादिवसांमध्ये आपल्या घरातील पूर्वजांच्या शांतीसाठी नैवेद्यसोबत श्राद्ध, पिंडदान, तर्पण इत्यादी विधी करण्यात येतात. पितृदोष मुक्तीसाठी हे सर्वात महत्त्वाचे दिवस असतात. पितृ पक्षाच्या 15 दिवसांत आणि सर्वपित्री अमावस्येला पितरांसाठी श्राद्ध केलं जातं. पण जगभरात अस एक मंदिर आहे, जिथे लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध आणि पिंडदान करतात. हो, अगदी बरोबर...कुठे आहे हे मंदिर आणि काय आहे आत्मश्राद्धामागील कारण जाणून घ्या. (only temple in the world where people perform shradh they are alive janardan mandir gaya)

कुठे आहे हे मंदिर?

हे मंदिर आहे भारतातील गयामध्ये, इथे मृत नातेवाईकांचं श्राद्ध आणि पिंड दान सोबतच जिवंत लोकांचं श्राद्ध आणि पिंड दान करण्यात येतं. गयामधील जनार्दन मंदिराची वेदी ही संपूर्ण जगात एकमेव अशी जागा आहे जिथे आत्मश्राद्ध म्हणजेच स्वतःचे पिंडदान जिवंत असताना करण्यात येतं. जिवंत असताना लोक श्राद्ध आणि पिंडदान करतात. 

गया येथील भस्मकूट पर्वतावर मां मंगला गौरी मंदिराजवळ जनार्दन मंदिर आहे. असे मानले जाते की येथे भगवान विष्णू स्वतः जनार्दन स्वामींच्या रूपात देह ग्रहण करतात. 

...म्हणूनच आपण जिवंत असताना पिंड दान करतो

आता प्रश्न असा आहे की लोक जिवंत असताना पिंडदान करण्याचे कारण काय? खरं तर हा विधी असे लोक करता ज्यांना मुलं नाहीत किंवा त्यांच्यासाठी पिंडदान करण्यासाठी त्यांच्या कुटुंबात कोणीही नाही. संन्यासी लोक देखील इथे येतात आणि त्यांचे पिंड दान करतात. मृत्यूनंतर त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून त्यांनी सांसारिक जीवन सोडलं असल्याने, ते गया येथील जनार्दन मंदिराच्या वेदीवर येऊन नमस्कार करतो आणि पिंडदान करतात. 

असं करतात आत्मश्राद्ध!

आत्मश्रद्धेसाठी तीन दिवसांच्या प्रक्रियेतून जावं लागतं. यामध्ये जिवंत व्यक्ती स्वतःसाठी पिंड दान देते. अशा लोकांना गया यात्रेला आल्यानंतर प्रथम वैष्णव सिद्धी प्राप्त करण्याची प्रतिज्ञा घ्यावी लागते. पापांचे प्रायश्चित्त करावे लागते. यानंतर भगवान जनार्दन स्वामींच्या मंदिरात विधीवत जप, तपश्चर्या आणि पूजेनंतर आत्मश्राद्ध केलं जातं.

या दरम्यान आत्माश्रद्धेसाठी वायु पुराणात सांगितलेल्या श्लोकांचा जप केला जातो. यानंतर दही आणि तांदळाचे तीन पिंड बनवून भगवान जनार्दनला अर्पण केले जातात. या पिंडात तिळाचा वापर केला जात नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. तर मृत व्यक्तीच्या श्राद्धात तिळाचा वापर अनिवार्य आहे. 

पिंड अर्पण करताना लोक भगवान जनार्दन स्वामींना प्रार्थना करतात - 'हे भगवान ! जिवंत असताना मी माझ्यासाठी शरीर पुरवत आहे. याचे तुम्ही साक्षीदार आहात. जेव्हा आपला आत्मा हे शरीर सोडेल. जेव्हा आपले शरीर मरेल तेव्हा आपल्या आशीर्वादाने आपला उद्धार होईल आणि मोक्ष प्राप्त होईल. या इच्छेने मी हे शरीर तुला अर्पण करतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)