भारतानं सुरुवातीलाच दिले बांग्लादेशला धक्के

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये भारतानं सुरुवातीलाच बांग्लादेशला दोन धक्के दिले आहेत. भुवनेश्वर कुमारनं सौम्य सरकार आणि शब्बीर रहमानला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.

Updated: Jun 15, 2017, 03:57 PM IST
भारतानं सुरुवातीलाच दिले बांग्लादेशला धक्के  title=

लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये भारतानं सुरुवातीलाच बांग्लादेशला दोन धक्के दिले आहेत. भुवनेश्वर कुमारनं सौम्य सरकार आणि शब्बीर रहमानला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.

१० ओव्हरमध्ये बांग्लादेशचा स्कोअर ४६/२ असा आहे. या मॅचमध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. पहिल्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडला 8 गडी राखून हरवले होते. पण पावसामुळे दुसरा उपांत्य सामना रद्द झाला तर टीम इंडिया फायनलमध्ये प्रवेश करेल.

भारतीय संघ : शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, युवराज सिंह, महेंद्र सिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, आर.अश्विन, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा

बांग्लादेश संघ : तमीम इकबाल, सौम्य सरकार, शब्बीर रहमान, मुशफिखुर रहमान, शाकिब अल हसन, महमुदुल्ला, मोसडेक हुसैन, मुर्तजा, रुबैल हुसैन, तस्कीन अहमद, रहमान