T20 World cup 2022: पाकिस्तावर दणदणीत विजयानंतर गृहमंत्री अमित शाह म्हणतात...

Team India च्या पाकिस्तावर दणदणीत विजयानंतर गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी देखील भारतीय संघाचे कौतूक केले आहे.

Updated: Oct 23, 2022, 06:47 PM IST
T20 World cup 2022: पाकिस्तावर दणदणीत विजयानंतर गृहमंत्री अमित शाह म्हणतात... title=

मुंबई : टी20 वर्ल्डकप 2022 मधील पहिला सामना भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) या दोन्ही संघांमध्ये रंगला. ज्यामध्ये विराट कोहली (Virat Kohli) आज विजयाचा हिरो ठरलाय. विराट कोहलीची कामगिरी पाहून प्रत्येक क्रिकेट चाहत्याने त्याचं कौतूक केलंय. विराट कोहली पुन्हा एकदा चांगल्या फॉर्मात आल्याने भारतीयांमध्ये देखील उत्साहाचं वातावरण आहे. टीम इंडियाने आज पाकिस्तानवर अतिशय चुरशीच्या सामन्यात विजय मिळवलाय. यानंतर भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झालाय.

भारताचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी देखील टीम इंडियाला विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. T20 विश्वचषकांची शानदार सुरुवात असून दिवाळी सुरु झाल्याचं अमित शाह यांनी ट्विट करत म्हटलं आहे. तर विराट कोहलीची धमाकेदार खेळी असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी  संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.

विराट कोहली हा क्रिकेटमधील रन मशीन म्हणून ओळखला जातो. त्याने पाकिस्तानविरुद्ध नाबाद 82 धावांची शानदार खेळी खेळली. पाकिस्तानला हरवून टीम इंडियाने भारतीयांना दिवाळी भेट दिली आहे. त्याच्या या खेळीनंतर रोहित शर्माही त्याचा चाहता झाला. विराटने शेवटपर्यंत हार मानली नाही आणि अखेरच्या चेंडूवर टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी देखील टीम इंडियाच्या या विजयावर ट्विट करत टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत.