बांग्लादेशचं लोटांगण, भारताला विजयासाठी एवढ्या रन्सची आवश्यकता

बांग्लादेशविरुद्धच्या टी-20मध्ये भारतीय बॉलर्सनी शानदार कामगिरी केली. 

Updated: Mar 8, 2018, 09:01 PM IST
बांग्लादेशचं लोटांगण, भारताला विजयासाठी एवढ्या रन्सची आवश्यकता  title=

कोलंबो : बांग्लादेशविरुद्धच्या टी-20मध्ये भारतीय बॉलर्सनी शानदार कामगिरी केली. टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय बॉलर्सनी बांग्लादेशला २० ओव्हर्समध्ये १३९ रन्सवर रोखलं. जयदेव उनाडकटनं सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या तर विजय शंकरला २ विकेट मिळाल्या. शार्दूल ठाकूर आणि युझवेंद्र चहलनं प्रत्येकी एक विकेट घेतली. बांग्लादेशच्या लिटोन दासनं सर्वाधिक ३४ रन्स केल्या तर सब्बीर रहमानला ३० रन्स करता आल्या.

श्रीलंकेविरुद्धची पहिली टी-20 हरल्यानंतर दुसरी टी-20 जिंकून ट्राय सीरिजमधलं आव्हान कायम ठेवण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरली आहे. बांग्लादेशविरुद्धच्या मागच्या पाचही टी-20मध्ये भारताचा विजय झाला आहे. त्यामुळे हे रेकॉर्ड कायम ठेवण्याची संधी भारतापुढे आहे. 

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x