IPL 2019: दिल्लीविरुद्ध टॉस जिंकून मुंबईची बॅटिंग, टीममध्ये दोन बदल

दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईने टॉस जिंकला आहे.

Updated: Apr 18, 2019, 07:44 PM IST
IPL 2019: दिल्लीविरुद्ध टॉस जिंकून मुंबईची बॅटिंग, टीममध्ये दोन बदल title=

नवी दिल्ली : दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईने टॉस जिंकला आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचमध्ये मुंबईने टीममध्ये दोन बदल केले आहेत. जेसन बेहरनडॉर्फच्याऐवजी बेन कटिंगला आणि इशान किशनऐवजी जयंत यादवला टीममध्ये संधी देण्यात आली आहे. इशान किशन आजारी असल्यामुळे तो ही मॅच खेळू शकत नसल्याचं रोहित शर्माने टॉसवेळी सांगितलं. मुंबईच्या टीममध्ये दोन बदल असले तरी दिल्ली मात्र त्याच टीमसोबत मैदानात उतरली आहे.

यंदाच्या मोसमात दिल्लीविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये मुंबईचा पराभव झाला होता. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या मॅचमध्ये ऋषभ पंतने वादळी खेळी केली होती. तर मागच्या वर्षी दिल्लीच्याच मैदानात मुंबईला पराभव पत्करावा लागला होता. या पराभवामुळे मुंबईचं मागच्या मोसमात प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचं स्वप्न भंगलं होतं. आता या दोन्ही पराभवाचा बदला घेण्यासाठी मुंबईची टीम मैदानात उतरेल. दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानामध्ये हा सामना होत आहे.

मुंबईची टीम

रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डिकॉक, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, बेन कटिंग, जयंत यादव, राहुल चहर, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा

दिल्लीची टीम

पृथ्वी शॉ, शिखर धवन, कॉलिन मुन्रो, श्रेयस अय्यर(कर्णधार), ऋषभ पंत, अक्सर पटेल, क्रिस मॉरिस, कीमो पॉल, कगिसो रबाडा, अमित मिश्रा, इशांत शर्मा

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा