भारतीय क्रिकेट संघाचा माजी आघाडीचा फलंदाज गौतम गंभीर हा नेहमीच काही ना काही वादामुळे चर्चेत असतो. कधी मैदानावर खेळाडूशी घेतलेला पंगा, तर कधी आपल्या विधानामुळे गौतम गंभीर हा नेहमीच चर्चेच्या अग्रस्थानी असतो. भारताने जिंकलेल्या टी-20 आणि 2011 च्या वर्ल्डकपमध्ये गौतम गंभीरने मोलाची भूमिका निभावली होती. याशिवाय कोलकाता नाईट रायडर्सचं नेतृत्व करतानाही गौतम गंभीरने आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. दरम्यान भारतीय क्रिकेटचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने गौतम गंभीरसंबंधी आपलं मत मांडलं आहे. चाहते आणि क्रिकेटतज्ज्ञ अनेकदा गौतम गंभीरसंबंधी गैरसमज करुन घेतात. पण गौतम गंभीर हा आपण पाहिलेला सर्वात निस्वार्थी क्रिकेटर आहे असं आर अश्विनने म्हटलं आहे. इतकंच नाही तर गौतम गंभीर "भारतातील सर्वात गैरसमज असलेला क्रिकेटर" असल्याचं आर अश्विन म्हणाला आहे.
"गौतम गंभीर हा सर्वाधिक गैरसमज असलेला भारतीय क्रिकेटर आहे. जेव्हा लढाईची वेळ येते तेव्हा महान व्यक्ती ही एकमेव व्यक्ती असते. तो जास्त व्यक्त होत नसेल. त्याने वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात केलेली खेळी आहेच, पण याशिवायही त्याने अनेक चांगल्या खेळी करत संघाला अंतिम सामन्यात पोहोचवलं. पण गौतम या सामन्यात चर्चा न झालेला हिरो ठरला. त्याने सामन्याचा दबाव आमच्यावर येऊ दिला नाही. तो निस्वार्थी आहे. तो 120-130 वर नाबाद राहू शकला असता. पण तो निस्वार्थ भावनेने खेळायचा. मला त्याच्याबद्दल नेहमीच आदर वाटतो. लोक त्याला त्याच्या पात्रतेपेक्षा खूपच कमी श्रेय देतात," असं आर अश्विनने म्हटलं आहे.
वर्ल्डकपमधील ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्यात आर अश्विनला रवींद्र जाडेजा आणि कुलदीप यादव यांच्यासह तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून संधी दिली जाऊ शकते. एम ए चिदंबरम स्टेडिअम फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल आहे. त्यात आर अश्विन डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांच्याविरोधात आर अश्विनचा रेकॉर्ड चांगला आहे. आर अश्विनने कसोटी सामन्यात डेव्हिड वॉर्नरला 11 वेळा बाद केलं आहे.
भारताविरुद्ध इंदूर येथे नुकत्याच झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अश्विनचा सामना करताना डेव्हिड वॉर्नरने उजव्या हाताने फलंदाजी केली होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण धावा करणाऱ्या स्मिथलाही आर अश्विनविरोधात संघर्ष करावा लागतो. विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये त्याला जास्त संघर्ष करावा लागतो. त्यामुळे चेपॉक येथील पहिल्या सामन्यात आर अश्विनला शार्दूल ठाकूरच्या जागी पसंती दिल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.
वर्ल्डकप संघ घोषित झाला तेव्हा त्यामध्ये आर अश्विनला स्थान देण्यात आलं नव्हतं. पण अक्षर पटेल दुखापतीमधून न सावरल्याने अखेर शेवटच्या क्षणी आर अश्विनला संधी देण्यात आली. आशिया कपमध्ये आर अश्विनने केलेली कामगिरी पाहता त्याच्या नावाचा विचार करण्यात आला. त्यामुळे वर्ल्डकपमध्येही आर अश्विनकडून फार अपेक्षा आहेत.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.