'सचिनला काही झाले असते तर भारतीय लोकांनी मला जिवंत जाळले असते', शोएब अख्तरने सांगितली आपबीती

 Cricket News :  शोएब अख्तर याने सचिन तेंडुलकर याच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. (Shoaib Akhtar on Sachin Tendulkar)

Updated: Aug 12, 2021, 12:02 PM IST
'सचिनला काही झाले असते तर भारतीय लोकांनी मला जिवंत जाळले असते', शोएब अख्तरने सांगितली आपबीती title=
सचिन तेंडुलकर आणि शोएब अख्तर

मुंबई : Cricket News : भारताचा महान फलंदाज मास्टर बास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि पाकिस्तानचा धोकादायक वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) यांच्यात रोमांचक लढाई झाली. क्रिकेटच्या मैदानावर या दोघांमध्ये अनेक वेळा चुरशीची स्पर्धा झाली आहे. शोएब अख्तर याने सचिन तेंडुलकर याच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. (Shoaib Akhtar on Sachin Tendulkar)

सचिनबद्दल अख्तरचा मोठा खुलासा

शोएब अख्तर याने सांगितले की, 2007मध्ये सचिन तेंडुलकर आणि त्याच्यामध्ये काहीतरी घडले, त्यानंतर भारतीय लोकांनी त्याला जिवंत जाळले असते. एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू एकत्र बसले होते आणि अख्तरने गंमत करत सचिनला उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर सचिन अख्तर याच्या हातावरून घसरला आणि खाली पडला.

गम्मत करण्याचा प्रयत्न करत होता

शोएब अख्तर याने स्पोर्टस्कीडाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्याने एका पुरस्कार सोहळ्यात सचिन तेंडुलकर याला गम्मतीने उचलण्याचा प्रयत्न केला, पण तो त्याच्या हातातून निसटला. अख्तर म्हणाला, 'मी गंमतीने सचिन तेंडुलकर याला उचलण्याचा प्रयत्न केला, पण तो माझ्या हातातून निसटला आणि तो खाली पडला.  

'भारताचे लोक मला जिवंत जाळतील'

शोएब अख्तर म्हणाला, 'मग मला वाटले की मी गेलो. मला वाटत होते की जर सचिन तेंडुलकर अनफिट किंवा जखमी झाला तर मला पुन्हा कधीही भारताचा व्हिसा मिळाला नसता. भारताचे लोक मला त्यांच्या देशात कधीही आमंत्रित करणार नाहीत किंवा मला जिवंत जाळतील. ' अख्तर मुलाखतीदरम्यान म्हणाला की, जर असे काही घडले असते तर कदाचित त्याला भारतीय भूमीवर परत येण्याची संधी मिळाली नसती. शोएब म्हणाला, 'पाकिस्ताननंतर जिथे मला सर्वाधिक प्रेम मिळते तो भारत आहे. जेव्हाही मी भारताला भेट दिली आहे, मी माझ्यासोबत चांगल्या आठवणी आणल्या आहेत.

अशी प्रतिक्रिया हरभजन आणि युवराजने दिली

शोएब अख्तरने सांगितले की, जेव्हा सचिन तेंडुलकर खाली पडला, तेव्हा हरभजन सिंह आणि युवराज सिंह देखील तेथे होते. ते म्हणाले ओह...काय करत आहे. त्यानंतर शोएब अख्तर सचिनकडे गेला आणि त्याला प्रेमाने मिठी मारली.