आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेश अंधारात, तेलंगणविरोधी आंदोलन कायम

स्वतंत्र राज्य तेलंगण निर्मितीला मंजुरी मिळाल्यानंतर आंध्रमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. जाळपोळ यासारख्या घटनानंतर आता वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विजयनगरसह अनेक भाग अंधारात बुडाले आहेत. दरम्यान, तेलंगणविरोधकांच्या आंदोलनाची धग आजही कायम आहे.

Oct 8, 2013, 11:51 AM IST

आंध्रच्या विभाजन मुद्दयावरून सीमांध्रामध्ये असंतोष

आंध्र प्रदेशच्या विभाजनाच्या मुद्दयावरून सीमांध्रामध्ये असंतोष पसरला आहे.. सरकारने विभाजन मागेघ्यावं या मुद्द्यासाठी वायएसआर काँग्रेसचे नेते वाय.ए. जगन मोहन रेड्डी यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. वाय.एस.आर. काँग्रेसच्या कार्यालयाबाहेरच ते उपोषणाला बसलेत.

Oct 5, 2013, 02:39 PM IST

आंध्र प्रदेशात तीन अतिरेकी घरात घुसले

आंध्र प्रदेशात घरात दहशतवादी घुसल्याने घबराट पसरली आहे. आंध्र प्रदेशच्या चित्तूरमध्ये पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. इथल्या एका घरात २-३ दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी या घराला घेरलं आहे.

Oct 5, 2013, 12:26 PM IST

स्वतंत्र तेलंगणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वतंत्र तेलंगणा राज्याला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी जाहीर केलं.

Oct 3, 2013, 08:19 PM IST

महाराष्ट्राचा नवा शेजारी... `तेलंगणा`!

स्वतंत्र तेलंगणासाठी सुरू असलेल्या साठ वर्षांच्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे. युपीए समन्वय समितीच्या बैठकीत स्वतंत्र तेलंगणाबाबत एकमतानं निर्णय घेण्यात आला.

Jul 30, 2013, 08:36 PM IST

स्वतंत्र तेलंगणाच्या औपचारिक घोषणेची शक्यता

स्वतंत्र तेलंगणाचा निर्णय आजच्या यूपीए समन्वय समितीच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे.

Jul 30, 2013, 10:51 AM IST

पी.साई संदीप JEE अॅडव्हान्स प्रवेश परीक्षेत पहिला

आंध्र प्रदेशातल्या पी.साई संदीप रेड्डीनं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच IIT साठी घेण्यात आलेल्या JEE अडव्हान्स प्रवेश परीक्षेत पहिला येण्याचा मान पटकावलाय.

Jun 22, 2013, 06:56 PM IST

सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्राच्या बाजूने निकाल

महाराष्ट्र-आंध्र प्रदेशच्या सीमेवर असलेल्या बाभळी बंधाराच्या बाधकामाविरोधातली आंध्राची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळं महाराष्ट्राला दिलासा मिळाला असून बाभळीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Feb 28, 2013, 09:42 PM IST

आंध्र, तामिळनाडूला वादळाचा धोका

बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूत जोरदार वादळ घुसण्याची शक्यता आहे. येत्या ४८ तासात तुफानी वादळाचा सामना करावा लागेल, अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

Dec 29, 2011, 12:37 PM IST