औरंगाबाद कचरा

औरंगाबाद कचऱ्याचा प्रश्न भिजत घोंगडे

औरंगाबाद: शहरात कचरा प्रश्न सुरु होऊन ८ महिने झालेत. मात्र अजूनही कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही.

Oct 11, 2018, 11:55 PM IST

पोलिसांची गुंडगिरी समोर, दगडफेकीचा सूड घेण्यासाठी गावात घुसले आणि...

पोलिसांची गुंडगिरी समोर आलीय. काल मिटमिटाच्या गावक-यांनी केलेल्या दगडफेकीचा सूड उगवण्यासाठी पोलिसांनीही थेट गावात घुसून गावक-यांच्या घरांवर दगडफेक केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. पोलिसांचा हा कारनामा सीसीटीव्हीत कैद झालाय. 

Mar 8, 2018, 10:31 PM IST

औरंगाबादचा कचरा प्रश्न पेटला, दगडफेकीत तीन पोलीस जखमी

कचरा प्रश्नावरून वातावरण चांगलंच तापलंय. मिटमिटा परिसरात महापालिकेच्या गाड्या कचरा टाकण्यासाठी गेल्या असता संतप्त नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत दगडफेक केली. या दगडफेकीत तीन पोलीस जखमी झालेत. जमाव पांगवण्यासाठी पोलीसांना लाठीचार्ज करावा लागला.

Mar 7, 2018, 04:12 PM IST

औरंगाबादचा कचरा प्रश्न जैसे थे, प्रशासन-ग्रामस्थ बैठक निष्फळ

शहरातील कचरा कोंडी जैसे थे आहे. कारण प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यातील बैठकीत कोणताही तोडगा या कचरा प्रश्नावर निघालेला नाही. दरम्यान, पोलीस बंदोबस्तात कचरा टाकण्यात आल्याचे वृत्त आहे.

Mar 2, 2018, 11:16 PM IST