सरकार विरोधात आक्रमक

उत्तर महाराष्ट्रात शेतकरी सरकार विरोधात आक्रमक

संपूर्ण कर्जमाफीसाठी येवला तालुक्यातील धुळगाव येथे शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांनी मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन करीत भाजप सरकारचा निषेध केला. शेतक-यांच्या शेतमालाला हमीभाव द्यावा तसेच कर्जमाफीचा निर्णय तात्काळ घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर काल झालेल्या आमानुष लाठीमाराचा यावेळी निषेध करण्यात आला. 

Jun 2, 2017, 11:37 AM IST