criticized

सलीम खान यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सुनावलं

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना ट्विटरद्वारे खडे बोल सुनावले आहेत. उरी हल्ल्यानंतर दोन दिवसांनी सलीम खान यांनी नवाज शरीफाना फटकारत नाराजी दर्शवली आहे. या पोस्टमध्ये सलीम खान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना बे-नवाज शरीर म्हटलं आहे.

Sep 21, 2016, 05:34 PM IST

उद्धव ठाकरे यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

बहुमतात असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने पाकिस्तानला धडा शिकवावा, असे सांगत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. 

Sep 21, 2016, 04:21 PM IST

भाजपवर उद्धव ठाकरे यांच्यानंतर राऊत यांचा हल्लाबोल

शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेनं भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरेंपाठोपाठ शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय. 

Jun 8, 2016, 06:47 PM IST

मोदींनी ब्रसेल्समध्ये पाकिस्तानला टोला हाणला

ब्रसेल्समध्ये हजारो भारतीय समुदायासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधला. 

Mar 31, 2016, 11:22 AM IST

छत्रपतींचा पुतळा : समुद्र कल्पनेवर राज ठाकरे यांची टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची टीका  

Feb 16, 2016, 10:15 PM IST

विरोधक गोंधळलेले आहेत : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरु असताना आणि राष्ट्रगीत न होता अधिवेशन स्थगित करण्यात आले. त्यामुळे सत्ताधारी  अधिक आक्रमक पाहायला मिळालेत. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर हल्लाबोल चढवला. विरोधकांची स्थिती गोंधळेली आहे, अशी टीका त्यांनी केली.

Dec 23, 2015, 09:57 PM IST

असहिष्णूताबाबत काँग्रेसने आम्हाला शिकवू नये : मोदी

देशात असहिष्णूतेची भावना निर्माण झाल्याचे आरोप  होत आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी साहित्यिक, चित्रपटकर्मी, शास्त्रज्ञ यांनी आपले पुरस्कार परत केलेत. तसेच काँग्रेस आणि कम्युनिष्ठ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठवलेय. याला आज मोदी यांची प्रत्युत्तर दिलेय. असहिष्णूताबाबत काँग्रेसने आम्हाला शिकवू नये, असे मोदी म्हणालेत.

Nov 2, 2015, 10:23 PM IST

उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरच्या सभेत पुन्हा भाजपवर निशाणा साधला

 आम्ही जर सत्तेत असलो तरी विकास होत नसेल तर आम्ही बोलणार. आम्ही जनतेला जी आश्वासन दिली आहेत. त्याची पूर्तता झाली आहे. कोल्हापूरचा टोलचा मुद्दा एकनाथ शिंदे यांनी सोडवला. राज्य सरकारने सोडविला नाही. भाजपने निवडणुकीच्या आधी खूप आश्वासने दिलीत. मात्र, निवडून आल्यानंतर त्याकडे पाठ दाखवलेय. प्रश्न काही सोडविलेले नाही, अशी सडकून टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. त्याचवेळी आज कोल्हापुरात ढाण्या वाघ एकटा लढतोय, असे सांगितले.

Oct 28, 2015, 09:20 PM IST

देवेंद्र फडणवीस सरकारचा फतवा, टीका म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा

सरकार आणि लोकप्रतिनिधींवर टीका केल्यास थेट देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा नवा फतवा निघालाय. असीम त्रिवेदी खटल्याचा संदर्भ घेत सरकारने नवा जीआर काढलाय.

Sep 4, 2015, 06:04 PM IST