railway fire

भयंकर VIDEO; फलकनुमा एक्स्प्रेसच्या तीन डब्यांचा जळून कोळसा

Falaknuma Express Fire: भारतीय रेल्वेला हादरा देणारी आणखी एक घटना घडल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. Falaknuma express  ला आग लागून या आगीत रेल्वेच्या तीन डब्यांचं नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. 

 

Jul 7, 2023, 12:50 PM IST

आग आणि सर्वत्र धुरच धूर, ट्रेनचे डब्बे जळाले; पहा घटनेचा व्हिडिओ

बिहारमधील मधुबनी रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एका रिकाम्या ट्रेनला भीषण आग लागली.

Feb 19, 2022, 10:55 AM IST

लाईफलाईनला पर्याय काय?

मुंबईच्या लाईफलाईनला पर्याय म्हणून जलवाहतुकीकडं बघीतलं जातयं. मुंबई आणि उपनगरांना समुद्र किनारा लाभल्यामुळं या पर्यायवर विचार केला गेलाय. या योजनेसाठी राज्य सरकारने प्रस्तावही तयार केला होता. मात्र इतर योजनांप्रमाणेच ही योजनाही सध्या लालफितीत अडकलीय.

Apr 19, 2012, 11:59 PM IST

रेल्वेचा खोळंबा, विद्यार्थ्यांना फटका

कुर्ला येथे सिग्नल यंत्रणा कक्षाला आग लागल्याने विस्कळीत झालेल्या रेल्वे सेवेचा मुंबई विद्यापीठच्या विद्यार्थ्यांना फटका बसला. मात्र, याची दखल घेऊन विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी वेळ वाढवून देण्याची तयारी दर्शविली आहे. तर ज्यांची परीक्षा चुकली त्यांची नव्याने घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

Apr 18, 2012, 04:05 PM IST

इस्टर्न हायवे जाम, प्रवाशांचे मेगाहाल

मध्य आणि हार्बरची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने याचा ताण रस्तेवाहतुकीवर पडला आहे. इस्टर्न हायवेवर वाहनांची गर्दी वाढलेली दिसून येत आहे. वाहतुकीची सेवा सुरळीत नसल्याने प्रवाशांचे मेगाहाल झाले आहेत. त्यातच वाहतुकीची कोंडी झाल्याने ट्रॅफीक जामचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून बेस्टने १३४ मार्गांवर जादा बस सोडल्या आहेत.

Apr 18, 2012, 02:10 PM IST

मध्य, हार्बरची रेल्वेसेवा विस्कळीत

मध्य रेल्वेच्या कुर्ला रेल्वेस्थानकाजवळच्या सिग्नल नियंत्रण केबीनला रात्री सव्वाबाराच्या सुमारास आग लागल्यामुळे मध्य, हार्बरची रेल्वेसेवा विस्कळीत झाली. त्यामुळे शेकडो प्रवाशांना रेल्वेस्टेशनवर रात्र काढावी लागली. दरम्यान, सिग्नल यंत्रणा दुरूस्त होण्यासाठी किमान तीन ते चार दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना चार दिवस उशिरा रेल्वेचा प्रवास करावा लागणार आहे.

Apr 18, 2012, 09:36 AM IST

मुंबईत रेल्वे प्रवाशांचे हाल, एक्सप्रेस गाड्या रद्द

मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबईकर प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. रेल्वे स्टेशन्सवर प्रवाशांची गर्दी उसळल्याने अर्धा ते एक तासाने धावणाऱ्या रेल्वेमुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप करावा लागत आहे. मध्य रेल्वेच्या सिग्नल बिघाड दुरुस्तीला दोन ते तीन दिवस लागणार आहेत. सिग्नल बिघाडाचा लांब पल्ल्याच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. प्रगती, सिंहगड, गोदावरी आणि राज्यराणी एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत

Apr 18, 2012, 09:35 AM IST