नोटाबंदी - हिंसाचारावरून राहुल गांधींची मोदी सरकारवर जोरदार टीका

गेल्या वर्षी मोदी सरकारनं घेतलेला नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे चुकल्याचा दावा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलाय.

Updated: Sep 12, 2017, 12:31 PM IST
नोटाबंदी - हिंसाचारावरून राहुल गांधींची मोदी सरकारवर जोरदार टीका title=

वॉशिंग्टन : गेल्या वर्षी मोदी सरकारनं घेतलेला नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे चुकल्याचा दावा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलाय.

अमेरिकेतल्या बारक्ले विद्यापीठात बोलताना राहुल गांधींनी हे विधान केलंय. इंडिया @ 70 या विषयावर राहुल गांधींनी विद्यापीठात भाषण केलं.

यावेळी नोटाबंदीनं देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसल्याचंही राहुल गांधींनी म्हटलंय. हा निर्णय घेताना मोदी सरकारनं देशातल्या कुणालाचा विश्वास घेतलं नाही. त्यामुळेच नोटाबंदी फसली असंही राहुल गांधींनी म्हटलंय.

याच भाषणात बोलताना राहुल गांधींनी देशात वाढणाऱ्या हिंसाचारावरही टीका केली.